आराम हराम नव्हे गरज we need rest


We need rest
We need rest


मानशास्त्रज्ञांच्या मते आराम हराम नाही तर ती एक मानसिक गरज आहे. खुप अभ्यासा नंतर ते या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत की व्यक्तीला ऊर्जा मिळवण्यासाठी आरामाची गरज असते. परंतु त्याचे एक सामाजिक महत्वही आहे. सतत कार्यशील राहा असा संदेश आपण ऐकत मोठे झालो पण समाजात सध्या बदल होत चालला आहे. आपण अशा समाजाकडे वाटचाल करत आहे तिथे प्रत्येक व्यक्ती सतत व्यस्त असते, ते इतके व्यस्त असते तिला खाण्यापिण्यासाठी आणि झोपण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

             अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार पंचवीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत पाच टक्के अधिक सूचना प्रत्येक व्यक्ती रोज ऐकते तर प्रत्येक व्यक्ती सुमारे एक लाख शब्द प्रतिदिन ग्रहण करते त्यामुळेच व्यक्तीच्या आयुष्यात इतर कोणत्या गोष्टीसाठी जागाच शिल्लक रहात नाही.

           आपण सतत कामात असल्याने कामाचा ताण असल्याने सदर एकाग्रता आवश्यक असते. मेंदूचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. काही अभ्यासकांचे संशोधनानुसार माणसाचा मेंदू काही काळाने विचलित होतो ही मानवी मेंदूची खासियत आहे. माणूस आणि मशीन यांच्यातील हा मूलभूत फरक आहेच पण त्यामुळे कामात संपूर्ण लक्ष न दिल्याने काही चुका होतात मात्र त्याचा फायदाही होऊ शकतो.

              मेंदू विचलित झाला की तो आपसूकच विचलित होणे आणि एकाग्रता ह्यांच्या दरम्यान अनेक प्रकारे संतुलन करतोआणि रचनात्मकता निर्माण होते. मात्र, सतत व्यग्र राहणाऱ्या व्यक्ती सतत एकाच मार्गाने चालत राहतात आणि नवीन रस्ता शोधू शकत नाही. व्यग्रतेमुळे रचनात्मकतेवर प्रभाव पडतो असे नाही तर काही नवे करण्याची इच्छा शक्ती कमी होते. न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंत अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणे विचारात घेता त्यांनी आपल्या सर्वात महत्त्वाचे आणि गुंतागुंतीच्या सिद्धांतांची संकल्पना आरामाच्या काळातच मांडल्या आहेत.

                मानसशास्त्रज्ञांच्या मते व्यग्रता आणि काम यांच्यामध्ये संतुलन राखणे हीच चांगली पद्धत आहे. अर्थात धकाधकीच्या आजच्या आयुष्यात हे सोपे नाही. हल्ली आपण ज्याला आराम म्हणतो तो खरोखरच आरामच असतो असे नाही. कारण अगदी गादीवर आडवे पडलो असलो तरीही message, chatting किंवा ई-मेल हे सुरु असते.

               आपल्या हातून काही महत्त्वाचे निसटून जावू नये असेच प्रत्येकाला वाटत असते. मानसशास्त्रज्ञांनी या अवस्थेतून वाचविण्यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत. उदाहरणार्थ बाहेर फिरायला जाताना फोन घरीच ठेवून जा. खेळण्यासाठी आणि आनंदी क्षण मिळण्यासाठी थोडा जास्त वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढाल तेंव्हा काम आणि त्यातील व्यग्रता आणि त्याचा ताण हे सर्व विसरून मजा करा.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट