पालेभाज्या खा निरोगी राहा




Keep the vegetables eat healthy
Green vegetable


             तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला संतुलित आहाराची गरज असते हिवाळ्याच्या काळात हिरव्या पालेभाज्या अगदी सहजपणे उपलब्ध होतात त्यास पोषक घटकांचे प्रमाणही अधिक असते त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच पोटाच्या समस्यांपासून सुटका होते मूत्रपिंडाचे समस्या दूर होते. हिरव्या पालेभाज्या आरोग्याबरोबरच सौंदर्यवर्धकही असतात. त्वचा,
केस, डोळे यांच्या अनेक आजार किंवा समस्या पासून बचाव करते.
            भाज्या शिजवून किंवा कच्चा किंवा सूप करून सेवन केल्या जाऊ शकतात. मेथी, पालक, मोहिरीची भाजी, मुळ्याची पाने, चाकवत, कोथिंबीर, चवळी या सर्व भाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

कर्करोगापासून बचाव : विरघळणार तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, खनिजे यांचे भरपूर प्रमाण हिरव्या पालेभाज्यांमध्ये असते. खनिज युक्त आहार घेतल्यानंतर कर्करोगासारखे आजार दूर ठेवण्यास मदत होते.

रक्ताची कमतरता
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या आयुष्यामुळे काही आजार व्यक्तीच्या शरीरात घर करतात. वेळेच्या कमतरतेमुळे आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. तसेच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होण्याचीही शक्यता असते. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक आहे. पालक मोहरीची भाजी मेथी सारख्या भाज्यांमधून लोह भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.

तारुण्य संवर्धन : हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास हाडे मजबूत होतात, शिवाय पोटाच्या समस्या भेडसावत नाहीत. मूत्रपिंडाच्या समस्या दूर राहतात. शरीरच जितके स्वस्थ आरोग्यपूर्ण असेल, तितकेच आजार त्यापासून लांब राहतात आणि व्यक्ती तरुण दिसते.

मुतखडा होत नाही : अनेकदा आजारातील बदलांमुळे मूतखडा होण्याची शक्यता असते. अर्थात ही, अगदीच सामान्य समस्या आहे. मात्र योग्य वेळी या समस्येवर उपचार करणे आवश्‍यक असते. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास मूत्रपिंडात आमला आम्ल जमा होऊ शकत नाही.

चमकदार त्वचा : हिरव्या पालेभाज्यांमधील सी जीवनसत्व फक्त हाडे मजबूत करण्यासाठी नाही, तर त्वचेसाठी फायदेशीर असते. रोज हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास त्वचेमध्ये नैसर्गिक उजळपणा येतो.

दृष्टी सुधारते : पालेभाज्यांमध्ये ए जीवनसत्त्व असल्याने आणि इतर पोषक घटक असल्याने डोळ्यांसाठीही त्या फायदेशीर असतात. दृष्टीशी निगडित काही समस्या भेडसावत असेल, तर हिरव्या पालेभाज्या खायला सुरुवात करावी. त्यामुळे दृष्टीत सुधारणा होईल.

स्थूलपणा कमी : शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी जाडेपणाला कारणीभूत ठरते. स्थूलता आली की आजारांना आमंत्रण मिळते. हिरव्या पालेभाज्या शरीरातील चरबी वाढू देत नाही. त्यामुळे स्थूलपणा येत नाही. आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.

प्रतिकार क्षमता वाढते : अँटिऑक्सिडंटचे प्रमाण पालेभाज्यांमध्ये अधिक असते. त्यामुळे शरीरातील प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. त्याशिवाय जीवाणूरोधक गुणही असतात. त्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि व्यक्ती लवकर आजारी पडत नाही.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट