प्रेमभंगामुळे कोलमडू नका
सध्याच्या काळात प्रेमभंग होण्याचे प्रमाण वाढले आहे . बदलेली lifestyle त्याला कारणीभूत आहे.
प्रेमसंबंधातील सगळीच नाती किंवा प्रसंग सुखात्म किंवा सुकांत नसतात. नात्यांमध्ये दु:खद क्षण वाट्याला आलेले बहुतांश माणसं एका अकालनीय दडपणाखाली वावरताना दिसतात. एक अनामिक भीती, एकटेपण त्यांच्या अस्तित्वाला ग्रासून टाकत. सतत ओलावणारे डोळे, निराशेचे मळभ, न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव, स्वतःचा राग आणि शेवटी दु:खाचा अश्रूं वाटे होणारा उद्रेक, या गोष्टी अगदी सर्वसामान्यपणे अशा लोकांमध्ये दिसून येतात.
विशेषतः व्हॅलेंटाईन डे सारख्या दिवशी या गोष्टी अधिक प्रमाणात दिसून येतात. त्यामुळेच या प्रकारच्या लक्षणांना आपण 'अनिव्हर्सरी रिअॅक्सन्स ' ही संज्ञा दिली आहे. ही मनोवस्था ओळखण, मान्य करणं आणि त्यावर उपाययोजना करणं जमलं नाही, तर त्याचं पर्यावसान एकाद्या आततायी किंवा चुकीचा निर्णयात होतआणि त्यातून संबंधितांना फक्त आणि फक्त दु:खद परिणाम भोगावे लागतात.
आपल्या दुःखात आपण सगळ्यात पटकन हे विसरतो की, ज्या नात्यामुळे वा प्रसंगामुळे आज आपल्या वेदना होत आहेत, त्याच नात्याच्या व क्षणाच्या एकेकाळी आपण प्रेमात पडलो होतो. मग ती एखादी व्यक्ती असो किंवा एखादं पाळीव प्राणी किंवा असं काहीही ज्याने तुम्हाला खूप आनंद दिला होता. मग हाच दिवस आहे आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या इतर मायेच्या नात्यांवर किंवा मित्रांवर लक्ष केंद्रित करायला हवय. तुमच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्ही क्षणांमदे तुमची इतर नाती, इतर ऋणानुबंदही सामील असतात. हे एक माये चा झाला आहे असं समजा, ज्यात तुमचा प्रत्येक सुहृद कायम केंद्रस्थानी आहे. मग विचार कसला करताय ? उचला फोन आणि सांगा तुमच्या आई-वडिलांना, भावा-बहिणींना, काका, मामा, मावशी, गुरू, मार्गदर्शक, मित्र-मैत्रिणींना की तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.
तुमच्या जोडीदाराशी तुमचा एक अत्यंत जिवाभावाचं खास असं नातं असलं, तरी हेही खरं आहे की, त्याच्या व्यतिरिक्तही अनेक अनमोल नाती तुमच्या अवतीभवती कायम होती आणि आहेत जी तुमच्या भल्याबुऱ्या क्षणांची साक्षीदार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्यावर बिंदास विश्वास टाका आणि पुढे चला.
त्या एका नात्याचं प्रसंगाचं यश किंवा अपयश हे तुमच्या अख्ख्या आयुष्याचं कधीच असू शकत नाही. तुमच्या आयुष्याची गोष्ट तुम्ही स्वतः लिहू शकता, हे कधीही विसरू नका. जगात एकसारखी दोन माणसे कधीच नसतात,अगदी जुळीसुद्धा! तेव्हा नेहमीच्या धावपळीतून वेळ काढा आणि स्वतःच्या या हटके असणाच्या भरपूर लाड करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा