चिकनगुनियाचे लक्षणं Symptoms of chikungunya in marathi



'चिकनगुनिया ' हा मुळात साहिली भाषेतील शब्द  आहे. पूर्वी हा आजार माकडांना होत असे. 'एडिस' इजिप्टी नावाच्या डासाची मादी या आजाराचा प्रसार करते. तिच्या चाव्यातून 'अरबो व्हायरस' नावाचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. एकदा त्यांनी शरीरात प्रवेश केला त्यांची संख्या वाढूनआजार व्यक्त  होण्याचा काळ पाच ते आठ दिवस इतका  असतो .या  आजारांची  मुख्य लक्षण खालीलप्रमाणे .

       ताप : तर कधी लो ग्रेड ( 99 ते 101 )हाय ग्रेड ( 101  ते  103 ) या प्रमाणात ताप येतो.  जास्तीत  जास्त  दोन ते तीन दिवस टिकतो. परंतु थोड्या थोड्या दिवसांनी पुन्हा येऊ शकतो

थंडी : ताप येता जोरात थंडी वाजून ंघरून घेऊन देखील ती कमी होत नाही.

डोकेदुखी  : डोके जड होऊन लागतं.

 मळमळ /ओकारी  : ही लक्षणे काही जणांमध्ये आढळतात.
 संधीशूल :  हे लक्षण अतिशय तीव्र असते. एकाच  वेळी  बरेच सांधे सुजतात आणि दुखू लागतात सांध्यात विंचू चावल्यासारखा वेदना होतात, असे काही रुग्ण सांगतात रुग्णाला कूस बदलणे अशकय होतं तो स्वतःच कुठलंच काम करू शकत नाही.
अगदी बोटांचे सांधे देखील असहकार पुकारतात संधीच्या  ह्या वेदना खूप सावकाश कमी होतात. चार महिने ते दोन वर्ष इतका त्या बर व्हायला घेतात . काही रुग्णांमध्ये थंडी पाऊस आहारातील बदल  यामुळे वेदना पुन्हा पुन्हा डोकं वर काढताना दिसतात . काहींना बरा व्हायला वेळ लागतो.

पुरळ  :  संपूर्ण त्वचेवर कुठेही बारीक पुरळ येतो त्याला खाज किंवा आग होणे ही लक्षणे असतात .तीन चार दिवसांनी पुरळ बसून तिथली त्वचा निघू लागते .

अशक्तपणा : एक आठवडाभर तरी टिकणारा जीवघेणा अशक्तपणा हे या आजाराचा अजून एक  लक्षण होय .
           काही रुग्णांमद्ये ही लक्षणा तीव्र स्वरूपात  दिसतात काही जणांमद्ये काहीच  लक्षणा दिसतात तर काही जनामाद्ये लक्षणांचा स्वरूप त्यामानानं सौम्य असता . ताप आणि सांदेदुखी मात्र सगळ्यांमद्ये  असते.
        चिकनगुन्याची लक्षण इतकी  स्पष्ट आणि तीव्र असतात कि अगदी सुरवातीला आजाराचा निदान  करण सहजशक्य असता तरी रक्त परीक्षणात  चिकन गुण्याच्या  व्हायरसचा RNA तपासता येतो , मात्र सातव्या दिवशी तो रक्तात आदळून शकतो.
       या आजारावर ताप गळणारी  आणि वेदनाशामक औषध घेतली तरी ती किती काळ ग्यावी  लागतील याचा भरवसा नसतो .काहीवेळा आठवड्यातून किंवा महिन्यातून  परत ताप येतो . सांदेदूकी आणि स्तब्दता  तर कधी काडी दोन वर्ष   पाट सोडत नाही .
      आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला , तर या ज्वराच्या प्रकारात अग्निमांद ,वातदोषाचे कामात   बिगाड होय.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट