हाताच्या थरथर￰ण्यावर आयुर्वेदिक उपचार aayurvedic treatment on hand shaking in marathi



aayurvedic treatment on hand shaking
aayurvedic treatment on hand shaking 



आयुर्वेदिक उपचार
                   हाताचे थरथरणे हे हाताबाहेरील अनियंत्रित आणि अनैच्छिक थरथरणे म्हणून वर्णन केले जाते. कधीकधी एखादे व्यक्ती उदासीनता, चिंता, तणाव, तणाव, जास्त धूम्रपानामुळे, थकल्यासारखे होऊ शकते. थरारांना शॉर्ट टर्म थरथर म्हणून ओळखले जाते आणि व्यक्तीच्या मज्जासंस्था शांत ठेवून सहजपणे बरे होऊ शकतात.

            'कंपवात' हा एक वातविकार असल्यानेआयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रीय उपचार केल्यास यावर नक्कीच चांगला उपयोग होतो. यामद्ये प्रामुख्याने शरीरातील मांस, मेद, मज्जा या धातूंची शक्ती वाढविणारे तसेच जोडीला मनोबल वाढविणारे औषधी व आहाराचा वापर केला जातो. त्याच्याच बरोबर पंचकर्म उपचार आला देखील अतिशय महत्त्व आहे.

मसाज व शेक 
                 आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या विविध वातशामक औषधांनी केलेल्या तेलाने शरीराला मसाज करणे, काही वेळा व त्यानंतर 'पिंड स्वेद' या प्रकाराने औषधीयुक्त भात व दूध यांच्या सहाय्याने शेक दिला जातो. बहुतांश रुग्णांमध्ये फक्त मसाज देखील उपयोगी पडतो. जो घरच्या घरी करता येतो.
           तीव्रता जास्त असल्यास बस्ती तसेच शिरोधारा ही पंचकर्म करावी लागतात. केरळीयन पद्धतीने गरम तेलाने मालिश करत शेकणे म्हणजेच पिंडीचीत हा उपचार विशेष उपयोगी पडतो.

औषधी उपचार
                  वनस्पतीज औषधांपैकी बला, शुंठी, लाक्षा, शतावरी, कवचबीज, अश्वगंधा, दशमुळ, कुचला, एरंड, विदारीकंद, मुशली, ब्राहयी, जटामांसी, शंकपुष्पी इत्यादि वनस्पती तर शुंगभस्म, सुवर्णमाशिक भस्म,रोप्य भस्म, सुवर्ण भस्म, नागभस्म, अभ्रमभस्म, त्रिवंग भस्म, इत्यादी भस्मांचा व यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या औषधांचा वापर केला जातो.

आहार मार्गदर्शन
                   आहारातील दूध,तूप, गव्हाचा शिरा, खीर उडदाचे घुटे, फळांपैकी आंबा, ही फळे कोहळ्याच्या वड्या, कोंबडी किंवा बोकडाचे मांस किंवा मटण, सूप,खजूर, बदाम, पिस्ताची खीर, डिंकाचा लाडू हे पदार्थ नियमितपणे घ्यावे.

हे लक्षात ठेवा
               वरील प्रमाणे उपचार करीत असताना शारीरिक कष्टाची कामे, हाताच्या बाबतीत लिखाणाचे काम, जागरण काही काळापर्यंत जास्तीत जास्त टाळल्यास मांस स्नायू नाड्यांचे बल लवकर वाढते. तसेच उबदार कपडे वापरणे, विश्रांती यामुळे आजार लवकर बरा होतो. मानसिक चिंता, भय, काळजी इत्यादींच्या निराकरणासाठी प्राणायाम ध्यानधारणा यांचा उत्तम परिणाम मिळतो.
            दुर्धर असा कंपवात उपचारांना अवघड असला, पूर्ण बरा होऊ शकत नसला तरीही आयुर्वेदिक उपचारांनी त्याचे प्रमाण अथवा त्रासाची तीव्रता निश्चितपणे  कमी करता येते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट